- जात मेळाव्यांवर बंदीने जातीचे राजकारण संपणार का?
राजकीय पक्ष जातबंधूंना आवाहन करून मतदारांना आकर्षित करतात, हे उघड सत्य आहे. अशावेळी असे जातीय मेळावे आयोजित केले गेले पाहिजेत का? सुशिक्षित वर्गावरही जातीचा पगडा असताना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या समाजातील जातीव्यवस्थेवर निवडून येण्याची ही ‘प्रथा’ थांबणार का?
- ‘ईस्टर्न फ्री वे’ला कुणाचं नाव द्यावं?
नामकरणावरून होणारे वाद आपल्यासाठी नवे नाहीत. याच विषयावरून मोठमोठी आंदोलनं, राडे झाल्याचं आपण पाहिलंय. या पार्श्वभूमीवर, ‘ईस्टर्न फ्री वे’च्या नामकरणाकडे तुम्ही कसे पाहता?, मुंबईची शोभा वाढवणा-या या रस्त्याला कुणाचं नाव द्यायला हवं, असं तुम्हाला वाटतं?
- ढोणीच टीम इंडियाला जिंकवू शकतो?
विंडीजमधील तिरंगी मालिकेतल्या दोन पराभवांनंतर, महेंद्रसिंग ढोणीविना टीम इंडिया अधुरी असल्याची चर्चा सुरू झालेय. ही चर्चा तुम्हाला कितपत योग्य वाटते? ढोणीच टीम इंडियाचा तारणहार आहे, त्याच्याविना संघ जिंकूच शकत नाही, हे तुम्हाला पटतंय का?