आईलाही विसरून
जाती या देशातील
पिले अडाणी
चल सोडून हा
देश पक्षिणी
विराण झाले
अरण्य सारे
भण भण करीती,
भीषण वारे
दिसे न कोठे
कण अन्नाचा,
कुठे दिसेना
पाणी
मोडून पडली,
घरटी कोटी
कशी राहशील
इथे एकटी
इठे न नांदे
कोणी जिवलग,
नसे आप्तही
कोणी
उडुन उंच जा
ऊर्ध्व दिशेला
मार्ग मानिनी
अन्य न तुजला
स्वार्थाविण
ना धर्म जाणिती,
खुळे येथले
प्राणी
|