उद्धवा, अजब
तुझे सरकार
!
लहरी राजा,
प्रजा आंधळी,
अधांतरी दरबार
!
इथे फुलांना
मरण जन्मता,
दगडांना पण
चिरंजीविता
बोरी-बाभळी
उगाच जगती,
चंदनमाथि कुठार
!
लबाड जोडिति
इमले माड्या,
गुणवंतांना
मात्र झोपड्या
पतिव्रतेच्या
गळ्यात धोंडा,
वेश्येला मणिहार
!
वाइट तितुके
इथे पोसले,
भलेपणाचे भाग्य
नासले
या पृथ्वीच्या
पाठीवर ना माणसास
आधार !
|