एकतारिसंगे
एकरूप झालो
आम्ही विठ्ठलाच्या
भजनात न्हालो
गळा माळ शोभे
आत्मरूप शांती
भक्तिभाव दोन्ही
धरू टाळ हाती
टिळा विरक्तीचा
कपाळास ल्यालो
भूक भाकरीची,
छाया झोपडीची
निवा-यास घ्यावी
उब गोधडीची
माया-मोह सारे
उगाळून प्यालो
पूर्व पुण्य
ज्याचे, मिळे
सुख त्याला
कुणी राव होई,
कुणी रंक झाला
मागणे न काही
सांगण्यास आलो
|